Thursday, September 30, 2010

प्रश्न

चार नाही चाळीस दिवस झाले तरी 
जेव्हा थेंबरही पाऊस पडत नाही 
तेव्हा शेतकऱ्याच्या जीवाचीच नाही फक्त 
तर सामन्यांचीही होते लाही लाही 
अश्रू डोळ्यातले लपवत लपवत 
देवाला दोष देताना 
आपली चूक नसल्याचा 
अविर्भाव आणताना 
खरच का चूक निसर्गाची 
का खरतर आधुनिकतेची 
प्रश्न पडती किती तरी 
रोजचीच कथा न्यारी 
भरभरून प्रगती करताना 
सहजतेने जग जिंकताना 
पुढची विण घालताना 
आपल्याच हाताने पुढले टाके बंद करताना 
क्षणभर तरी कधी विचार केला असेल 
काय उद्याच तर आपला शेवट नसेल 
आपल्याबरोबर करोडो माणसे मरतील
लाखो जीव नाहक बळी जातील 
जलचर वनचरच नाही तर उभायाचारही जग सोडतील 
ह्रास होईल साऱ्या सृष्टीचा 
ह्रास होईल ह्या बुद्धीचा 
माज करून ज्याच्या जोरावर  
अख्ख जग जिंकल होत 
तिलाही शेवटी झुकत माप घ्यावाच लागेल 
निसर्गापुढे आपल डोक ठेवावच लागेल 
अस सार असताना 
सार काही समजताना 
चार बुक शिकलेल्यांना 
आव्हान करते पुन्हांदा 
जागे व्हा आता तरी
सोडून द्या मनमानी 
वेळ वाया घालवू नका
प्रगती जरूर करा पण
निसर्ग नियमांना डावलू नका 
त्याला राग्येईल अस काही 
कधी कधी वागू नका 
जंगलतोड थांबवा 
प्लास्टिक वर बंदी घाला 
कायद्याची वाट न बघता
मनालाच थोडा आवर घाला 

तेजश्री 

No comments:

Post a Comment