Friday, January 28, 2011

हुरहूर


बोलायचं खुप काही,
सांगायचं अजून काही 
पण आभाळ दाटून आलय 

समजवायचं तुला काही, 
समजून घ्याचय मलाही काही 
पण मन वेड भरून आलय 

समजवायचं जरी काही
शब्दच अपुरे पडता आहेत 
आभाळाला पाणी साठवायला 
ढगच कमी पडता आहेत 

किती बर झालं असत जर 
काही न बोलताही सगळ तुला कळल असत
किती बर झालं असत जर 
काहीच न सांगता सार तुला उमगल असत

मी आधीच बोलणार नाही
बोलले तर अर्जवता नाही 
मला अस म्हणायच नव्हत 
अस शंभरदा म्हणणार 
मनात नसतानाही उगा तुला 
शब्द माझे घायाळ करणार 

शब्दांची जखम भरण्यासाठीही 
कोणते मलम लावणार 
समजूत तुझी काढण्यासाठी 
हुरहूर मनी दाटणार 

शब्दांचे अश्रू गाली हळू खाली आले
मर्यादेची काजळरेष उलंघून ओघळले 
भावनेचा बांध अचानकच तुटला 
डागाळलेला एक ढग भसकन फुटला 

हुरहूर मनात दाटून राहिली 
ह्याची नाही की शब्दांची पुंजी कमी पडली 
पण ह्याची की भावना पोहचवायला प्रीत माझी कमीच पडली.... 

तेजश्री

No comments:

Post a Comment