Monday, December 13, 2010

दुःख

फुटावा काचेचा चषक खळSळ
हजार व्हावी त्याची शकलं
तसच काहीस झाल
अन सार आयुष्याच बदलल  

नात आमच तुटू लागलं 
मनाला वेदना देऊ लागलं
जखमांवर जखमा करू लागलं 
असहाय्यतेच्या चक्रात फिरलं 

एक वेळ अशी होती 
झूट सारी नाती होती 
एकमेकांशिवाय जगायची 
कल्पनाच करवत नव्हती 

तेव्हा क्षण युगासारखा वाटायचा 
विरह अजिबात सहन नाही व्हायचा 
आजही क्षण युग सारखा वाटतो 
कारण क्षणोक्षणी दुःखाचा पूर येतो 

कळून जेव्हा मला चुकले 
ह्या जगात सारे एकले 
जगायचे एकुले मारायचे एकुले 
दोष देत आपलेच नशिबाले 

भोग सारे भोगावेच लागणार 
सार काही विसरावं लागणार 
दुःखावर फुंकर घालावी लागणार 
ताकही फुंकून प्यावं लागणार 

तेजश्री 

No comments:

Post a Comment