फुटावा काचेचा चषक खळSळ
हजार व्हावी त्याची शकलं
तसच काहीस झाल
अन सार आयुष्याच बदलल
नात आमच तुटू लागलं
मनाला वेदना देऊ लागलं
जखमांवर जखमा करू लागलं
असहाय्यतेच्या चक्रात फिरलं
एक वेळ अशी होती
झूट सारी नाती होती
एकमेकांशिवाय जगायची
कल्पनाच करवत नव्हती
तेव्हा क्षण युगासारखा वाटायचा
विरह अजिबात सहन नाही व्हायचा
आजही क्षण युग सारखा वाटतो
कारण क्षणोक्षणी दुःखाचा पूर येतो
कळून जेव्हा मला चुकले
ह्या जगात सारे एकले
जगायचे एकुले मारायचे एकुले
दोष देत आपलेच नशिबाले
भोग सारे भोगावेच लागणार
सार काही विसरावं लागणार
दुःखावर फुंकर घालावी लागणार
ताकही फुंकून प्यावं लागणार
तेजश्री
No comments:
Post a Comment