Wednesday, December 22, 2010

सुख की दुःख?

पक्ष्यांना स्वछंदी असण्याच 
की बिनआखलेल्या रस्त्यावर आपली दिशा शोधत फिरण्याचा शाप मिळाल्याच 

माणसांना बुद्धिमान असण्याच 
की असलेली बुद्धी वापरात राहण्यासाठीच्या कष्टाचं

प्राण्यांना बोलता येत नसल्याच 
की ह्या हत्यारी माणसाला कधीच जाणीव करून देऊ शकत नाही ह्या हतबलतेच 

झाडांना स्वतःच अन्न स्वतः बनवता येत ह्याच 
की आयुष्यभर एका जागी उभ राहण्याची शिक्षा मिळाल्याच 

जीवाणुना लहान आणि साध असण्याच 
की जन्मभर जगण्यासाठी झगडण्याच 

आकाशाला असंख्य जीवांना छप्पर दिल्याच 
की कायमच टांगत राहाण्याच 

पृथ्वीला लाखो जीवांची आई होण्याच 
की सतत भ्रमंती करत राहाण्याच 

काय आहे ह्या साऱ्यांना सुख का दुःख ?

तेजश्री 

No comments:

Post a Comment