ओळखीचे चेहरे एकदम अनोळखी का वाटतात ?
अनोळखी चेहरे अचानक ओळख का दाखवतात ?
विसरू पाहणाऱ्या गोष्टी नेमक्या का आठवतात ?
आठवणीत ठेवण्यासारख्या अचूक का विसरतात ?
कितीही ठरवूनही काही लोक टाळता का येत नाहीत ?
कितीही ठरवूनही टाळलेले लोक विसरता का येत नाहीत?
अनेकदा आपण मनाविरुद्ध का वागतो ?
प्रियव्यक्तींच्याच बाबतीत आपण कडवट का होतो?
कळत नकळत आपण दुखावले का जातो ?
आपण आपला राग प्रियजनांवरच का काढतो?
कितीही वाईट वागून जिवलग माफ का करतात ?
कितीही चांगल वागून शत्रू मात्र हेवा का करतात ?
जगाच्या भीतीने आपण मन का मारतो ?
मन मारताना आपलच सुख का हिरावतो ?
ह्या का ची उत्तर काळही का देत नाही ?
उत्तर मिळवण्यासाठी अख्खा जन्मही का पुरत नाही ?
- तेजश्री
2 gud!!!! kharach khup chan lihili aahes!!!
ReplyDelete@Shantanu: Thanks
ReplyDelete