Sunday, December 5, 2010

का?

ओळखीचे चेहरे एकदम अनोळखी का वाटतात ?
अनोळखी चेहरे अचानक ओळख का दाखवतात ?

विसरू पाहणाऱ्या गोष्टी नेमक्या का आठवतात ?
आठवणीत ठेवण्यासारख्या अचूक का विसरतात ?

कितीही ठरवूनही काही लोक टाळता का येत नाहीत ?
कितीही ठरवूनही टाळलेले लोक विसरता का येत नाहीत? 

अनेकदा आपण मनाविरुद्ध का वागतो ?
प्रियव्यक्तींच्याच बाबतीत आपण कडवट का होतो?

कळत नकळत आपण दुखावले का जातो ?
आपण आपला राग प्रियजनांवरच का काढतो?

कितीही वाईट वागून जिवलग माफ का करतात ?
कितीही चांगल वागून शत्रू मात्र हेवा का करतात ?

जगाच्या भीतीने आपण मन का मारतो ?
मन मारताना आपलच सुख का हिरावतो ?

ह्या का ची उत्तर काळही का देत नाही ? 
उत्तर मिळवण्यासाठी अख्खा जन्मही का पुरत नाही ?

- तेजश्री 

2 comments: