Saturday, April 30, 2011

चक्र

वाळलेलं झाडं कुणाला आवडत?
पिकलेल पान कुणाला भावत?

झाडं बहरण्याआधी वाळावच लागत
नवांकुराधी पोक्त पानाला गळावच लागत

वसंतानंदासाठी शिशिरानी यायचच
सुख चाखण्याआधी दुःख चाटायचच

अमृतानुभवासाठी स्वर्ग गाठायचाच
सागरभेटीपायी सरीतेने ठेचा खायच्याच

आयुष्य एक रेशमी वस्त्र, सुखाच गुंफलेल
दुःखाच्या वेलबुट्टीशिवाय न उठावलेल

एकमेकांचा पाठलाख सुख दुःख करत
नियतीच चक्र न दमता फिरत


तेजश्री

No comments:

Post a Comment