बेभान सुटलेला बोचरा वारा
आधीच जगाच्या बोचत्या नजरा
गरज तेव्हा मला होती, तुझ्या आधाराची,
तुझ्या संरक्षणाची, मायेची, उबेची
सार विसरण खुप अवघड होत माझ्यासाठी
भविष्य गाठण्यापायी भूतकाळा टाकणे पाठी
तुझ्या आधाराची अपेक्षा मी कधी व्यक्त केली नाही
तु मात्र क्षणोक्षणी दर्शवलीस त्याची खंतही
पण माझी भूमिका तु नाहीच समजून घेतली
तुला मी गृहीत धरण्याची फार मोठी चूक केली
शेवट पर्यंत तुला समजण्यासाठी मी धडपडत होते
झिजत होते, क्षणोक्षणी हजारदा पडत होते
लग्नबंधनात बद्धताना आशा नवल औस्तुक्य होते
हळुवार उलगडणारे नियतीचे रसाळ कोडे वाटले होते
संसार एक दलदल, खोल पाय ओढणारी
खोल खोल गेल्यावरही तोल ढाळणारी
जून होईतो चविष्ट होणाऱ्या दारूचेही दाखले ऐकले
अखेर दारूच भिनली, शरीरभर रक्ताचे विष झाले
आता काळजी नको करू, जगेन मी कशीही, निराधार!
कारण आता मी गेले आहे जन्म मृत्युच्या पार
आता समोरचा वणवा पोटात आग पाडतच नाही
डोळ्यांदेखतचा महासंग्राम घायाळ करतच नाही
हळवी कळी तु उमलायाच्या आधीच तोडलीस
आता नियतीच्या शिक्षेच वावग नको वाटून घेउस
तुझ्या यातना माझ्या हृदयापर्यंत पोहोचतच नाहीत
निब्बर आतड्याला आणखीन पिळ आता पडतच नाहीत
तू तुझे निर्णय घ्यायला मोकळा होतास आणि असशील
प्रायश्चित्ताचे किमान नाटक तर न करशील
तेजश्री
१०.१२.२०११
kay chan kelis .... kas kay suchali ...... reply nakki kar
ReplyDeleteधन्यवाद .... असंच वाचनात आल्या काही गोष्टी त्या कवितेच्या माध्यमातून कागदावर उतरवल्यात बस...मला आपल नाव कळू शकेल का?
ReplyDelete