Friday, February 1, 2013

प्रसंग




पुलावर बसले होते राजा आणि राणी 
पुलाखालून वाहून गेले बरेचसे पाणी 

आता मात्र नदी झाली होती शांत 
पाचोळा गेला वाहून जीवन विश्रांत 

भाव झरले नेत्रातून अनेकदा ह्या आधी 
आज मात्र सारे बोले हस्तमिठी साधी 

झाड उभ होत पोक्त हात नम्र जोडून 
सुचवत होत पुढली वाट एकमेकांना सोडून 

राजा तो होता श्रीमंत आटपाट नगराचा 
पण तरी होणार नव्हता कधी त्या राणीचा 

आजची भेट वाटलेलं, चित्र करेल भंग  
रास रंगात भिजलेले जागवेल प्रसंग 

घडवायचे नियतीला मात्र उलटे होते 
बंधनातही प्रेम जगवायचे होते 

निखळ प्रेमाच उमटलं बिंब जळात 
सृष्टी नाहिली राजा-राणीच्या प्रेमात 

तेजश्री 
०१.०२.२०१३ 

No comments:

Post a Comment